लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, पुढचे 6 महिने तरी टेन्शन नाही, प्रत्येक महिन्याला 1500 मिळणारच


    राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरु आहे. राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. असं असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले देखील गेले आहेत.

    पण राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. यानंतर राज्य सरकारकडून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा होणार आहेत. राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून येत्या 17 ऑगस्टला 3 हजार रुपये मिळणार आहेत. हे पैसे किती दिवस मिळणार? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिलांना पुढचे 6 महिने तरी टेन्शन नाही. कारण त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत ही कमीत कमी सहा महिने तर शंभर टक्के मिळणार आहे.

अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या ?

    अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरीत केला आहे. “लाडली बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी वर्षाला लागणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल”, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. 17 तारखेचा पहिल्या हप्त्याचा निधीसह पुढचे सहा महिन्यांचा निधीची तरतूद केली आहे.

    योजनेची केवळ घोषणा झाली तशा अफवा पसरल्या जात आहेत. “लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी आजही सुरू आहे. मात्र 17 तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडल्यानंतर नोंदणी अधिक वाढेल. राज्य शासनाने आणलेली ही योजना चालूच राहणार आहे”, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. नोंदणीचा आकडा आजच्या घडीला दीड कोटींपर्यंत पोहोचला आहे. सरकारने अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ देण्याचा अंदाज काढला होता.

    लाखोंच्या संख्येने ज्या अर्थी महिला नोंदणी करतात त्याअर्थी त्यांनाही योजना आवडलेली आहे. या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून या योजनेचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय. कुठल्याही दुसऱ्या योजनेवर लाडली बहीणमुळे अजिबात परिणाम पडलेला नाही”, अशीदेखील माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली.

    त्यामुळे या योजनेचा दुसऱ्या योजनांवर अजिबात नकारात्मक परिणाम पडलेला नाही. साडेबारा कोटी जनता ते राज्याचा बजेट पाहते, खोटे आश्वासन त्यामध्ये देता येत नाही”, असं अदिती तटकरे यावेळी म्हणाल्या. “अन्नपूर्णा योजनेसहीत मोफत शिक्षण सारख्या योजनांचे जीआर शासनाने काढले आहेत. तसेच ज्यावेळी अर्थमंत्री एखादा योजना घोषित करतात तेव्हा निधीची तरतूद करूनच घोषणा करतात. लाडकी बहीण योजनेमुळे चालू असलेल्या योजना किंवा नवीन योजनांवर अजिबात नकारात्मक परिणाम पडणार नाही.

    मात्र ज्या अर्थी जनतेचा प्रतिसाद महायुतीच्या योजनांना मिळत आहे, त्यामुळे योजनांना विरोध करण्याचा अपयशी प्रयत्न विरोधक करत आहेत. जे योजनांवर टीका करत आहेत तेच त्यांच्या मतदारसंघातील सर्वात जास्त नोंदणी करून घेत आहेत. मात्र जनता या भूलथापांना बळी पडणार नाही”, अशा शब्दांत अदिती तटकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका विरोधकांकडून पाहायला मिळत आहे. “विरोधकांना लाडकी बहीण योजनेचा विरोध करायचे म्हणून ते विरोध करत आहेत.

0 टिप्पण्या